कर्जत। नेरळ ग्रामपंचायतीसाठी नवीन प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर झाली आहे. या नळपाणी योजनेसाठी नव्या मार्गाने मुख्य जलवाहिनी टाकण्यात येत आहे. नव्या मार्गामुळे नेरळ नळपाणी योजनेच्या मुख्य जलकुंभात थेट पाणी पोहचवण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, नेरळ नळपाणी योजना योजनेच्या मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम देण्यात आले असून मे २०२५ पर्यंत पूर्ण होऊन कार्यान्वित होण्याची शक्यता दिसून येत आहे.
नेरळ ग्रामपंचायत हदीसाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने प्रादेशिक नळपाणी मंजूर केली आहे. त्या पाणी योजनेचे भूमिपूजन २०२३ मध्ये झाले आहे
मात्र मागील दीड वर्षात नळपाणी योजनेचे काम पुढे सरकले नव्हते. परंतु शासनाकडे या नळपणी योजनेचे बजेट वाढवून देण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत आणि त्यानंतर नेरळ नळपाणी योजनाईचे रखडलेले काम सुरु झाले असल्याची चर्चा नेरळ गावात सुरु आहे. मे २०२३ मध्ये नेरळ नळपाणी ही ४० कोटींची होती आणि आताही नळपाणी योजना ४० कोटींचे पुढे गेली असल्याचे बोलले जात आहे. मात्र शासनाकडे हा प्रस्ताव मंजूर झाला किंवा नाही? याबाबत नेरळकरांना कोणतीही माहिती नाही. परंतु मागील दीड वर्षे नेरळ गावातील लोकांच्या तोंडाचे पाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नळपाणी योजना पूर्ण कधी होणार? असा प्रश्नकायम सतावत आहेत.
मागील काही दिवसानापासून नेरळ नळपाणी योजनेचेच्या मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पूर्वी मुख्य जलकुंभ येथे पाडा भागातून जलवाहिनी जात होती. आता नव्या नळपाणी योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्र येथून मुख्य जलकुंभ येथे जाणारी ही आता कर्जत कल्याण राज्यमार्ग येथून टाकण्यात येत आहे. त्याचा फायदा हा मुख्य जलकुंभ येथे पाणी थेट पोहचण्यास अडचणी दूर होणार आहेतदरम्यान, नवीन नळपाणी योजनेसाठी टाकण्यात येत असलेली जलवाहिनी आणि अन्य प्रलंबित कामे वेगाने होणार, अशी अपेक्षा नेरळकरांना वाटत आहे.