कर्जत। हिमालयाने भारताला जिरेटोप दिला आहे आणि त्या निसर्गाला हानी पोहचवण्याचे कार्य मानव करीत आहे. निसर्गाचा हास म्हणजे मनुष्यजातीचा हास हे नक्की आहे आणि त्यामुळे निसर्गाला हानी पोहचवण्याचे कार्य मानवाने थांबवावे, असे आवाहन माउंट एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक संतोष दगडे यांनी केले. कर्जत येथे जागतिक पर्वत दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि साहस आऊटडोअर्स तसेच विप्रेड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर या शाळेतील विद्याथ्यर्थ्यांसाठी जागतिक पर्वत दिन कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माऊंट एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक संतोष दगडे यांचा महिला मंडळ संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष दगडे यांनी विद्याथ्यांशी हितगुज करताना पर्वताचे महत्व कोणते आणि काय आहे पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांना पर्वतांच्या संवर्धनाची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्वताविषयी माहिती देण्याबरोबरच सर्व मुलांना ‘पर्वत’ हा लघुपट दाखविण्यात आला.