कर्जत। नेरळ ग्रामपंचायत हद्दीत खांडा गावात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाण्यातून अळ्या येत असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून खांडा गावात जाणारी जलवाहिनी जमिनीबाहेर काढून दूषित पाणी कुठून येत असल्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.
नेरळमधील खांडा गावात मोहाची वाडी येथे असलेल्या नेरळ नळपाणी योजनेच्या मुख्य जलकुंभामधून पाणीपुरवठा होतो. या जलकुंभापासून खांडा गाव हे अवध्या ५०० मीटर अंतरावर असून गेले काही दिवस खांडा गावातील काही भागात अशुद्ध पाणी येत असल्याची तक्रार ग्रामस्व करीत होते. या गावात साधारण ५०० घरांची वस्ती असून काही व्यावसायिकदेखील असल्याने पाण्याची गरज जास्त असते. त्यात मुख्य जलकुंभाजवळ हे गाव असल्याने खांडागावातील ग्रामस्थांकडे चांगला पाणीपुरवठा होत असतो. गेली कित्येक दिवस नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील खांडा विभागामध्ये दूषित पाणी येत आहे.
पाण्यामधून अळ्या आणि दुर्गंधी येत असून हे पाणी कसे प्यायचे? असा प्रथ नागरिकांना पडला आहे. ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे असा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थ मनोहर हजारे यांनी तीन दिवसापूर्वी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये जाऊनखांडा गावातील समस्या मांडली असता प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले यांनी तात्काळ उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले, त्यानंतर गुरुवारी (२६ डिसेंबर) सकाळपासून नेरळ ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचान्यांनी खांडा गावातील जलवाहिनी खोलली आहे.जमिनीमध्ये असलेली जलकहिनी बाहेर काढून कोणत्या ठिकाणी गटाराचे सांडपाणी पाण्यात मिसळते आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमधील सर्व भागाला ज्या मुख्य जलकुंभामधून पाणीपुरवठा होती, हेमून अगदी जवळ असलेल्या खांडा भागात नळाद्वारे दूषित पाणी कसे जात आहे? याचा शोध घेण्याचा प्रयल केला जात आहे. त्यां दूषित पाण्याला विशेष दुर्गंधी येत असून पाण्यात आल्या देखील येत असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. याबाबत स्थानिक ग्रामस्थ मनोहर हजारे यांनी पाणी प्रश्रावर आमहाता गेली कित्येक दिवस पिण्यायोग्य पाणी येत नाही. पाण्यामध्ये जंतू असतात आणि पाण्याला दुर्गंधी येत असून नेरळ ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी ग्रामस्थांच्यावतीने दिला आहे.