कर्जत । नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून टेम्पोमधून बैलाची तस्करी करून त्यांना कंटाळलीसाठी नेले जात होते. पोलिसांना माहिती मिळताच अगदी शिताफीने नेरळ पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून गाडी पकडली. त्या गाडीमधून कोंबून ठेवलेल्या बैलांची सुटका केली असून विनापरवाना बैलांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत तिवरे येथील भूषण हाबळे, बाळाराम ठाकरे आणि दामत येथील जफर सिद्धीकी नजे हे टेम्पो मधून बैलांची तस्करी करीत होते. सुझुकी पिकअपमधून बैलांना कोंबून नेले जात होते. कॅरीमध्ये बाजुस एकूण तीन लाख ६० हजाराची गोवंशीय जनावरे यांची वाहतूक केली जात होती. चोरुन आणलेली जनावरेयांना त्या टेम्पोमध्ये दाटीवाटीने, त्यांच्या चाऱ्यापाण्याची व्यवस्था न करता, त्यांना क्रुरतेने बांधुन स्वतःचे फायद्याकरीता कत्तलीकरीता घेवुन जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्या गाडीमध्ये चार बैलांना कोंबून नेले जात होते आणित्यांची सुटका करण्यात आल्यावर त्या बैलांना कोमल वाडी येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे.

याबाबत पोलीस कर्मचारी अबूश्री बेंद्रे यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहेत.