आई वडिलांच्या मेहनतीचे मोल ओळखा, चुकीच्या मार्गाला लागून आयुष्य उध्वस्त करू नका : हरेश काळसेकर
सहज सेवा फाउंडेशनचा शिक्षणं क्षेत्रातील सातत्यपूर्ण उपक्रम….
खोपोली…
विद्यार्थ्याच्या मनातील सामजिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी तसेच माहिती जाणून घेण्यासाठी सहज सेवा फाउंडेशन मार्फत सातत्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरू असतात.
शाळेत व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीमध्ये सामजिक समस्या,लैंगिक समस्या व शंका असतात.दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या माध्यमातुन होणारी फसवणूक,सोशल मीडियाच्या अती व चुकीच्या वापराने होणारे नुकसान, आपली जबाबदारी व कर्तव्य यावर आजही समाजात मोकळेपणाने संवाद साधला जात नाही.यातील अज्ञानामुळे विपरीत परिणाम सुध्दा शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर होत असतात.
सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातुन शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नामांकीत डॉक्टर्स व समुपदेशक यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय वर्ष ( 2022-23) या वर्षात विवीध शाळांमध्ये मार्गदर्शन संपन्न होत आहेत.याच अनुषंगाने आनंद शाळा, शीळफाटा येथील कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी मार्गदर्शन गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी संगम रिसॉर्ट,शीळफाटा येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तराच्या मार्गाने प्रभावी प्रबोधन केलें.
यावेळी आनंद शाळा,शिळफाटाच्या मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी, , स्वप्नील बाळापूरे,गोकुळ नंबियार, स्नेहा नाईक,आकांशा तिवारी, सामजिक कार्यकर्ते हानीफ दुदुके, संग्राम देशमुख,दिवेश राठोड उपस्थित होते.आजच्या उपक्रमास सुमारे 200 विदयार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे,खजिनदार संतोष गायकर,संघटक निलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, सल्लागार राजेंद्र फक्के,मार्गदर्शक मोहन केदार,नम्रता परदेशी,सुबोध दाभाडे,अजय उमाळे यांनी अथक परिश्रम घेतले.या उपक्रमासाठी वीरांगना फाउंडेशनच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
ऑनलाइनच्या माध्यमातुन होणारी फसवणुक व आपली सतर्कता हे विदयार्थीदशेत खुप महत्त्वाचे आहे तसेच आई वडिलांच्या योगदानाचे महत्त्व जाणून अभ्यास मन लावून करावा असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी केले.
शाळेमध्ये अश्या प्रकारच्या अभियानामुळे विदयार्थी आपल्या मनात असलेल्या शकांना व्यक्त करू शकतील व पुढील आयुष्यात नक्कीच याचा पुरेपूर उपयोग होईल असा आशावाद आनंद शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी यांनी व्यक्त केला.