आज सकाळी १०.३० च्या सुमारास तानसा(आखाराचापाडा) येथील नवरी मुलगी व त्यांचे वऱ्हाड हे विवाहासाठी बेंदवड येथे प्रवास करत असताना वऱ्हाड भरलेला टेम्पोचा चालकाचा नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात १३ महिला,पुरुष व लहान बालकांचा दुखापतग्रस्त आहेत.
याघटनेची माहिती मिळताच ग्रुप चे सन्माननीय सदस्य व मा.आमदार पांडुरंग बरोरा यांनी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे भेट दिली.
शिवसेनेची शहापूर येथे अद्यावत असलेली रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध केली.
यामधील चार रुग्णांची स्तिथी गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय ठाणे येथे नेण्यात आले आहे.